दि. ९ मार्च २०१२.... राहुल द्रविडने क्रिकेट मधून निवृत्त होण्याची ग्वाही केली. आश्चर्याचा धक्काच बसला होता तो. अजूनही तो काही काळ क्रिकेट मध्ये खेळू शकला असता तो, त्याने जो निर्णय घेतला त्यावरून काही शंका मात्र नक्कीच निर्माण केल्या आहेत. विविध वर्तमान पत्रे, बातम्या यामधून त्याचे गुणगान होणे नवल नव्हते, आजच्या दिवशी... तशी त्याची कामगिरीही होती. क्रिकेट मध्ये त्याला एक मानाचं नाव हि दिलं होतं ते म्हणजे "the wall" म्हणजेच "भारताची भिंत", या नावानेही तो ओळखला जातो. खरेही आहे, कारण मीही त्याची खेळी पहिली आहे. एका तपस्वी साधूप्रमाणे सर्व आयुष्य क्रिकेट ला अर्पण करून तो खेळत होता. क्वचितच तो कमी रन करून बाद होत होता, परंतु जर टिकला तर समोर येणारा प्रत्येक चेंडू मग जगातल्या कोणत्याही गोलंदाजाचा असू दे, तो त्या चेंडूला आपला बळी होण्याची संधी देत नव्हता, प्रत्येक गोलंदाजाला तो रडवल्याशिवाय राहत नव्हता. त्याला बाद करण्यासाठी सर्व गोलंदाज रक्ताचं पाणी करत असत परंतु " the wall " ला मोडणे एवढे सोपे नव्हते राव.
माझ्यासाठी द्रविड एक आदर्शच आहे असे म्हणायला हरकत नाही. त्याचा स्वभाव, त्याचा भारतीय संघाबरोबरीचा एवढा प्रवास, शिस्तबद्धता, सहनशीलता, शांतपणा, खेळातील तंत्रज्ञान यामुळे तो एक आदर्शच म्हणायला हवा.
क्रिकेटमधील त्याची कामगिरी पाहता आजपर्यंत केलेली सर्वोत्तम कामगिरी हि एकदिवसीय सामन्यापेक्षा कसोटी मध्ये केलेली आहे. त्याने १६४ कसोटी सामने खेळले असून त्यात १३२८८ रन्स केलेत व सचिन नंतर सध्या जगातील २रा खेळाडू ठरला आहे, तर ३६ शतके ठोकत २०० पेक्षा जास्त झेल घेतल्या आहेत, त्याचा तो क्रिकेट प्रवास आठवला कि एका महापुरुषाची आठवण येते, अंगावर शहरे येऊन खूप अभिमान वाटतो त्याचा. खरच त्याला या क्रिकेट मध्ये व जन्मात विसरणे शक्य नाही. सौरव गांगुली ने कर्णधार पद सोडल्यानंतर राहूलनेच कर्णधारपदाचा भार सांभाळला होता. तसेच तो एक चांगला यष्टीरक्षक हि आहे. कधी कधी गोलंदाजीही केली आहे. त्यामुळे तो एक अष्टपैलू खेळाडू आहे. अशा या खेळाडूला माझ्या कडून पुढील आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना व शुभेच्छा.
- महेंद्र राजेशिर्के
No comments:
Post a Comment