Saturday, April 14, 2012

आनंदवन आणि दान

वादग्रस्त? आणि एखादी देणगी किंवा दान? डोकं फिरलंय का टीकाकारांच., मग स्विस बँकेतला पैसा हि अनु नका भारतात. तोही काळाच आहे. एखादी व्यक्ती देणगी देते मग ती व्यक्ती कोणतीही असुदे त्या व्यक्तीने जर तो पैसा चांगल्या कामासाठी खर्च केला तर यात सामान्य किंवा पवित्र माणसाच्या प्रयत्नांचा विजयाच म्हणावा लागेल. उलट वाद्ग्रस्थ असा सर्व पैसाच गरिबांसाठी खर्च व्यव अशी अपेक्षा ठेवायला पाहिजे, कोणत्या बळावर हे टीकाकार स्वतःला ईश्वरनिष्ठ समजतात? सर्व राजकीय पक्ष व्यावसायिक यांचा कला पैसा समाजसेवेसाठी खर्च केला पाहिजे, शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रजेच्या हितासाठी सुरत लुटली होती. मग त्या स्वराज्यात जन्मलेली हि मानसी असे कसे बोलू शकतात. अनमिशिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना देऊ केलेला नजराणा तुकारामांनी अमान्य केला, तो विषय वेगळा होता, तुकारामांना दोन वेलची भाकरी मिळत होती, आनंदवनातील रुग्णांना ती मिळते का किंवा एव्हडी मदत मिळते का? मग का जाहिरात केली एवढी? जाहिरात करताना अति लागू करायला पाहिजे होत्या(पुणेरी भाषेत), १००% विश्वासाने सांगतो कोणीही मदत केली नसती. हि मदत केवळ बाबा आमटे यांच्या समाजसेवेला अर्पण होत आहे. वादग्रस्त पैसा कुठून येतो याची चर्चा वेगळी झाली असती. परंतु आनंदवनाच्या रुग्णांसाठी मदतीची गरज आहे, मग सर्व स्तरातून पैसा येण्याची प्रार्थना केली पाहिजे. याउलट टीका करून आम्हाला फक्त गोरा पैसा पाहिजे याची अपेक्षा करत राहिलो तर तुम्ही हि उपाशी मारलं आणि आनंदवनातील रुग्ण हि. आणि आलेला पैसा हा कोणत्या कारणासाठी खर्च केला जातो याचा विचार महत्वाचा, स्वतः बाबा आमटे यांनी अशी शिकवण केली कि कोणालाही नाही म्हणून नये अशा गोष्टीसाठी, मग त्यांचा आदर्श घेणारे कोणत्या बळावर स्वतःला विचारवंत समजतात याचाच विचार प्रथम करणे गैर नाही.

दि. १५ एप्रिल २०१२

No comments:

Post a Comment