Sunday, December 25, 2011

खालसा व शीख धर्माबद्दल थोडेकाही:-

एके दिवशी टि.व्ही बघत असताना डिस्कवरी वर शीख धर्म आणि खालसा याबद्दल एक कार्यक्रम लागला होता. त्यामुळे मला या धर्माबादल कुतूहल वाटले. हिंदू धर्माप्रमाणेच हा वैभवशाली धर्म आहे. त्याची परंपरा आणि इतिहास हा मोठा आहे. हा धर्म मला हिंदू धर्माच्या जवळ असल्याची कारणे आहेत. महत्वाचे म्हणजे हा धर्म हिंदूचा एक प्रमुख अंग आहे तथा तो हिंदू धर्मातून तयार झाला आहे. इतर कारणांमध्ये या धर्मातील माणुसकी आणि परोपकारी विचारसारणी हि आहे. सदर कार्यक्रमात सुवर्ण मंदिराबद्दल सांगण्यात आले. या सुवर्ण मंदिरावरील स्वर्ण आच्छादन दर वर्षी लकलकीत केले जाते. काही विशिष्ठ व्यावसायिक कारागिरांकडून त्यांचा रखरखाव केला जातो. परंतु त्यासाठी ते अजूनही प्राचीन पद्धतीचा अवलंब करतात. त्यांच्या मते हि पद्धती वापरल्यास सोन्यावर त्याचा सोन्यावर काहीच दुष्परीणाम होत नाही. त्यामुळे शिखांचे हे पवित्र तीर्थस्थळ एकजुटीमुळे खूप संरक्षित राहिले आहे हे कळते.

शीख धर्माचे पहिले गुरु गुरुनानक हे आहेत. यांचा जन्म १४६९ मध्ये लाहोर जवळ असलेल्या तलवंडी गावात झाला. त्यांनीच शीख धर्माची स्थापना केली. शीख धर्मात ज्या व्यक्तींचा समावेश होता. ते बहुतेक करून हिंदू व मुस्लीम या धर्मातील होते. गुरुनानक यांनी "सतनाम" च्या प्रचाराला सुरुवात केली, हिंदुस्थान, श्रीलंका, अरबस्थान आणि इराण या देशात यात्रा केली. यात्रा संपल्यानंतर ते पंजाब प्रांतात करतारपूर गावात स्थायिक झाले. काही काळानंतर त्यांना हातात शस्त्रे घेणे भाग पडले. त्याचे कारण म्हणजे या धर्मावर इतर राज्यकर्त्यांची आक्रमणे. त्यामुळे शिखांनी स्वरक्षणासाठी हाती तलवारी घेतल्या. प्रत्येक घरातून एक व्यक्ती दान केले जात होते. मग हा/हि व्यक्ती तलवार घेऊन समाज रक्षणासाठी आपले पूर्ण जीवन दान करत असे. (राष्ट्रीय स्वयंसेवक दल हे हिंदू धर्मातील एक उदाहरण आहे युध्द नीतीचे) मग शिखांनी या युध्द कौशल्याचा उपयोग "खालसा" मध्ये केला.

१६ व्या शतकात गुरु अंगद गुरु झाला. त्यांनी "गुरुमुखी" लिपीचा शोध लावला. त्यानंतर या पंथात दोन पंथ निर्माण झाले. ते म्हणजे "उदास" पंथ आणि "नानक" पंथ शीख समाजात मूर्ती पूजा अमान्य असल्यामुळे "ग्रंथसाहेब" ची स्थापना झाली. (माझ्या मते हिहि एक मुर्तीपुजाच आहे).

शिखांवर अत्याचार चालू झाल्यानंतर बादशहा जहांगीर ने आरोप केला कि गुरु अर्जुनदेव यांनी त्याचा पुत्र खुशरो याला पळून जायला मदत केली आणि त्याने गुरु अर्जुनदेव यांची हत्या केली. या नंतर शीख समाज खूप भडकला. त्यांनी मग दोन्ही पंथ एक करून सर्वांना एका छताखाली आणले. यालाच "खालसा" म्हणतात.

शिख धर्माची महत्वाची तत्वे म्हणजे सर्व धर्मातील विस्थापितांना एकत्र आणुन काहि तत्वे जोपासणे. माझ्या मते त्याकाळी असलेल्या हिन्दु समाजाने बहिष्क्रुत केलेल्या लोकांना हा धर्म आश्रय दिला असावा. तसेच या धर्मातील तत्वांनुसार समाजसेवा हि केली जाते. स्वर्ण मंदिरात दररोज कितीतरी लोकांना भोजन दिले जाते. परंतु नविन दिक्षा घेतलेल्या तरुणांना युध्ध कौशल्य हि शिकविले जाते. जेणेकरुन या धर्मावर परकिय आक्रमणे होणार नाहित. त्यासाठी तलवार, भाले, काठ्या. इ. चा वापर केला जातो. त्यामुळे हा धर्म हिन्दु धर्माच्या जवळचा आहे. व भारतातील यांचे हिंदु धर्माबरोबर फ़ारसे वाईट संबध नाहीत.

सदर लेखात काही चुका आढळल्यास माफ़ी असावी.

No comments:

Post a Comment